Tula pahate re latest news 2 वर्षापूर्वी झी मराठी वर येऊन गेलेली “तुला पाहते रे” या मालिकेने अल्पावधीतच खूप प्रसिद्धी मिळविली होती. या मालिकेने सर्वांनाच वेड लावलं होतं. ही लोकप्रिय मालिका इतक्या लवकर का संपली हा प्रश्न सर्वच प्रेक्षकांना पडला होता. काहींनी म्हटलं डायरेक्टर बदलण्यात आल्याने मालिका बंद झाली. कोणीतरी म्हटलं सुबोध भावें यांना व्यस्त कार्यक्रमामुळे मालिकेला वेळ देता येत नव्हता, तर कोणी म्हटलं, शेवटी शेवटी टीआरपी कमी झाल्याने बंद करण्यात आली. वरील पैकी कोणतेच कारण मालिका बंद होण्याला कारणीभूत नव्हते.
कोणतीही मालिका सुरू होण्या अगोदरच मालिकेची मूळ कहाणी ठरलेली असते, ही गोष्ट सर्वांनाच माहिती असेल. मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक हे मालिकेची कहाणी ठरवीत असतात. Tula pahate re latest news त्यानंतर मालिकेला किती पुढे न्यायचं हे मालिकेचे दिग्दर्शक आणि लेखक ठरवीत असतात.
तुला पाहते रे ही मालिका खरे तर ठरलेल्या पेक्षा जास्त काळ चालली होती. कारण मालिका सुरू होण्यापूर्वी कथानकचा विचार करून ही मालिका फक्त 230 एपिसोड ची ठरविण्यात आली होती. या मालिकेला प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद पाहून मालिकेने 298 एपिसोड चा टप्पा गाठला होता.
तुला पाहते रे मालिकेने टीआरपी चे सर्व रेकॉर्ड मोडून काढले होते. त्यामुळेच कमी काळ का असेना पण ही मालिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहील आणि याच कारणाने ही मालिका परत एकदा प्रेक्षपित करण्यात येत आहे. Tula pahate re latest news असो सुबोध भावे आणि गायत्री दातार लवकरच आपल्याला दुसऱ्या एका मालिकेत दिसून यावेत हीच अपेक्षा.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा.